मैत्री म्हणजे अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी केलेली सोय असते

अनेकदा मैत्री म्हणजे अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी केलेली सोय असते. मित्र म्हणजे एक दुभत जनावर जे निमुटपणे दुध देत जाते पण त्याला माहीतच नसते की ज्या दिवशी दुध बंद होईल तेव्हा त्याची किंमत शुन्य असणार आहे. आणी मग त्याच्याकडे होऊन गेलेल्या सर्व गोष्टींवर पश्चाताप करण्यापुढे काहीच उरत नाही. 
समाजात दोन प्रकारचे मित्र असतात त्यातला एक असतो तो मैत्रीकडे खूप आदराने पाहतो, मैत्रीत सगळ काही देऊ करतो तर दुसरा असतो तो फक्त आणि फक्त फायदा काढून घेण्यात मग्न असतो, त्याला भावनांची कदर असेलच आसे नाही. जेव्हा या नात्यात दुरावा निर्माण होत जातो तेव्हा एक मित्र आगदी शांत होऊन आपल्या वाटेने निघून जातो एकही प्रश्न न विचारता आणी दुसरा मात्र त्याला मागून पुन्हा पुन्हा प्रश्न विचारात आसतो की तू का जातो आहेस? का जातो आहेस? पण त्याने जर तोच प्रश्न एकदा स्वःताला विचारला तर उत्तर नक्कीच मिळेल की जाणारा नक्की का जातोय?

नाते जोडताना स्वार्थ बाजूला ठेवावा, असे प्रेत्येकालाच वाटते.
नाते अतूट असावे कधीच न तुटावे, असे प्रेत्येकालाच वाटते,
पण. . असे वाटणाऱ्या अनेकांना, फक्त असे वाटतच राहते.