नवं जळणं

आठवणीच्या सरणावर,
एक प्रेत एकटच जळत आहे
मरणं जरी रोजच असलं,
जळणं मात्र नवं आहे.
- विक्रम ढेंबरे
ओठांच्या कळ्यांत, 
हसणे उमलते. 
गालावरच्या खळीची, 
साथ त्यास मिळते. 
पापणीच्या शिंपल्यात, 
मोती नजरेचा चमके. 
केसांची ही रेशीमरेष, 
वाऱ्यावर लहरे. 
तुझ्या रुपात थिजले, 
माझे कटाक्ष चोरटे. 

-विक्रम ढेंबरे


त्या आठवणी

धुक्याच्या पडदयामागे उमटतात, 
धुसर पुसटश्या जुन्या त्या आठवणी. . .  

पुन्हा पहाव्या पुन्हा जगाव्या,
पुन्हा हव्याश्या वाटतात त्या आठवणी. 

पानावर दवापरी उतरतात,
क्षणिक ओलावा देऊन ओझरतात
त्या आठवणी


- विक्रम ढेंबरे 

कित्येकदा मांडलेले,
कित्येकदा विस्कटते.
नवे डाव मांडता मांडता,
हातून बरेच कही निसटते,

जे मिळवले ते आपले,
हरवले ते नियतीचे.
उरले सुरले घेउन तारे,
आकाश आपले सजवायचे

कधी न थकता, न थांबता
पुढे पुढेच चालत रहायचे. . . .

आठवणी

पावसाला माझे सांगणे आहे,
तू आता बरसणेच सोडून दे.
नाहीतर असे कर ना. . .
तुझा तू बरसातच रहा,
माझी काही हरकत नाही,
फ़क्त तुज सोबत जडलेल्या
आठवणी तेवढया खोडून जा.

बरसण्याआधी

पावसाची पहिली सर बरसण्याआधी,
नुकताच हरवलो होतो तुज्याच आठवणीत.
थेंब उतरले आणी जणू कही सांगूनच गेले,
तू देखील माला अजून विसरलीस नाही.

- विक्रम ढेंबरे

पाऊस येणार

पाऊस येणार, पाऊस येणार, हिरवे होऊन शिवार सजणार.
मोती बरसणार, झरे वाहणार, इंद्रधनुचे रंग उमटनार.
ती आणी तो, तो आणी ती, एकाच छत्रीत मानसोक्त भिजणार.

- विक्रम ढेंबरे

दुष्काळ


नाही बरसले ढगही पुन्हा,
धरणीचे आंगण सजवाया.

पिकही ना तरले उभ्या रानात, 
पोटांची या खळगी भराया. 

धरणीची  हो माया आटली, 
इथ ना कोणी तहान भागवाया.

आपुलकीची नाळ तुटली,
कुंपणच उठले शेत खाया. 

दुष्काळाच्या या चित्ते वरती,   
सारे काही भाजत आहे.

राणा शिवारात आमच्या,  
सुतक शांतता भासत आहे.

मित्रा तूझीच होती साथ . . .

गुदमरलेले स्वाश होते,
मनी तन्मयता दाटली,
आधार नव्हता कोणाचाच,
तेव्हा तूच सोबतीला आला होतास.

धूसर होती पायवाट,
प्रवास अवघड आयुष्याचा,
संभ्रमाचे ढग दाटले चोहीकडे,
तेव्हा फक्त तूझीच होती साथ.

मित्रा तूझीच होती साथ . . .